११ फेब्रुवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय पाचवा भाग - २

श्री गणेशाय नमः दुर्वास म्हणाले-धन्य आहे! आज मी भगवंतांच्या भक्तांचे महत्व पाहिले. राजन! मी तुझा अपराध केलेला असूनही तू माझ्यासाठी शुभ कामनाच करीत आहेस. ज्यांनी भक्तवत्सल भगवान श्रीहरींच्या चरणकमलांना घट्ट मिठी मारली आहे,‌ त्या साधुपुरुषांना कोणता अनुग्रह अवघड आहे? आणि अशा महात्म्यांना कोणता अपराध विसरणे अशक्य आहे? ज्यांच्या नामाच्या केवळ श्रवणाने जीव निर्मल होऊन जातो, या भगवंताच्या दासांना कोणते कर्तव्य शिल्लक राहते? महाराज! आपले हृदय करुणेने भरल्यामुळेच आपण माझ्यावर मोठेच उपकार केले. कारण आपण मी केलेले अपराध विसरून माझ्या प्राणांचे रक्षण केलेत.

            राजा काही न खाता त्यांच्या परत येण्याची वाट पाहात होता. आता त्याने दूर्वासांचे चरण धरून आणि त्यांना प्रसन्न करवून भोजन घातले. राजाने आदरपूर्वक आणलेले अतिथीला योग्य असे सर्व प्रकारचे भोजन करून दुर्वास तृप्त झाले. आणि राजाला आदराने म्हणाले, "राजन! आता आपणही भोजन करावे." भगवंतांचे भक्त असणाऱ्या आपले दर्शन, स्पर्श, संवादाने मनाला भगवंताकडे प्रवृत्त करणाऱ्या आतिथ्याने मी अत्यंत प्रसन्न आणि उपकृत झालो आहे. स्वर्गातील देवांगना वारंवार आपल्या या उज्ज्वल चरित्राचे गायन करतील. ही पृथ्वीसुद्धा आपल्या परम पुण्यमय कीर्तीचे संकीर्तन करीत राहील."

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...