२५ जानेवारी २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध आठवा - अध्याय बाविसावा भाग - ५

श्री गणेशाय नमः श्रीभगवान म्हणाले - ब्रह्मदेवा, मी ज्याच्यावर कृपा करतो, त्याचे धन हिरावून घेतो, कारण मनुष्य जेव्हा धनाच्या मदाने उन्मत्त होतो, तेव्हा तो माझा आणि लोकांचा तिरस्कार करू लागतो, आपल्या कर्मांमुळे पराधीन होऊन हा जीव अनेक योनींमध्ये भटकत राहतो आणि जेव्हा कधीतरी मनुष्यशरीर प्राप्त करतो, त्यावेळी जर कुलीनता, कर्म, अवस्था, रूप, विद्या, ऐश्वर्य, धन इत्यादी कारणांनी त्याला गर्व झाला नाही, तर त्याच्यावर माझी मोठीच कृपा झाली आहे, असे समजावे. सर्व प्रकारच्या कल्याणाच्या विरोधी असणाऱ्या मला जे शरण येतात, ते कुलीनता इत्यादी पुष्कळशा अभिमान आणि ताठा उत्पादन करणाऱ्या कारणांमुळे मोहित होत नाहीत. हा बली दानव आणि दैत्य अशा दोन्ही वंशांमध्ये अग्रगण्य आणि त्यांची कीर्ती वाढविणारा आहे अतिशय कठीण आहे. जिला जिंकणे अतिशय कठीण आहे, त्यामुळे वर यांनी विजय मिळवला आहे. त्या मायेवर याने विजय मिळविला आहे. तू पाहतच आहेस की, एवढे दुःख भोगूनसुद्धा हा खचला नाही. याचे धन हिरावून घेतले, राजपदावरून याला दूर केले, याची निंदा केली, शत्रूंनी बांधले, बांधव सोडून निघून गेले, इतके याला कष्ट भोगावे लागले. एवढेच काय, गुरुदेवांनी निर्भर्त्सना करून शापसुद्धा दिला. शिवाय मी याला उपहासाने बोललो.पण या दृढव्रत सत्यवादीने सत्याला अनुसरून आपला धर्म सोडला नाही. म्हणून मोठमोठ्या दैवतांनासुद्धा महत्प्रयासाने जे स्थान प्राप्त होत नाही, ते स्थान मी त्याला दिले आहे. सावर्णी मंन्वन्तरामध्ये हा माझा परम भक्त इंद्र होईल. तोपर्यंत हा विश्वकर्म्याने बनविलेल्या सुतल लोकामध्ये राहील. तेथे राहणाऱ्या लोकांना माझ्या कृपादृष्टीमुळे शारीरिक किंवा मानसिक रोग, थकवा,ग्लानी, शत्रूकडून पराभव आणि कोणत्याही प्रकारच्या विघ्नांशी सामना करावा लागत नाही. महाराज इंद्रसेन, तुझे कल्याण असो. आता तू आपल्या बांधवांसह, स्वर्गातील देवतासुद्धा ज्याची इच्छा करतात, त्या सुतल लोकात जा. मोठमोठे लोकपाल सुद्धा आता तुला पराजित करू शकणार नाहीत. मग इतरांची काय कथा ! जे दैत्य तुझ्या आज्ञेचे उल्लंघन करतील, त्यांचा माझे चक्र नाश करील. तुझे, तुझ्या अनुयायांचे आणि (तुझ्या) भोगसामग्रीचे सुद्धा मी सर्व प्रकारच्या विघ्नांपासून रक्षण करीन. वीर बली, तु मला तिथे नेहमीच आपल्याजवळ असल्याचे पाहाशील. दानव आणि दैत्यांच्या संसार्गाने तुझा जो काही आसुरभाव असेल, तो माझ्या प्रभावाने ताबडतोब दबून नाहीसा होईल.
।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...