१४ मार्च २०२२

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध नववा - अध्याय सतरावा

श्री गणेशाय नमः श्रीशुक म्हणतात - पुरूरव्याचा आयू नावाचा एक पुत्र होता. त्याला नहुष, क्षत्रवृद्ध, रजी, शक्तिशाली रंभ आणि अनेना असे पाच पुत्र झाले. राजा, आता क्षत्रवृद्धाचा वंश ऐक. क्षत्रवृद्धाचा पुत्र सुहोत्र होता. सुहोत्राला काश्य, कुश आणि गृत्समद असे तीन पुत्र झाले घरात समुदायाचा एक पुत्र झाले.गृत्समदाचा शुनक पुत्र झाला. याच शुनकाचे पुत्र ऋग्वेदियांमध्ये श्रेष्ठ मुनिवर शौनक झाले.
काश्याचा पुत्र काशी, काशीचा राष्ट्र, राष्ट्राचा दीर्घतमा आणि दीर्घतमाचा धन्वन्तरी. हेच आयुर्वेदाचे प्रवर्तक आहेत. हे यज्ञातील भागाचे भोक्ते आणि भगवान वासुदेवांचे अंश आहेत. यांचे स्मरण केल्यानेच रोग दूर होतात. धन्वन्तरीचा पुत्र झाला केतुमान आणि केतुमानाचा भीमरथ.
भीमरथाचा दिवोदास आणि दिवोदासाचा द्युमान. त्यांचे एक नाव प्रतर्दन असेसुद्धा आहे. हाच द्युमान शत्रूजित,वत्स, ऋतध्वज आणि कुवलयाश्व या नावांनीही प्रसिद्ध आहे. द्युमानाचेच अलर्क इत्यादी पुत्र झाले. परीक्षिता ! अलर्काखेरीज दुसऱ्या कोणत्याही राज्याने सहासष्ट हजार वर्ष तारुण्यावस्थेत राहून पृथ्वीचे राज्य उपभोगले नाही. अलर्काचा पुत्र झाला संतती. संततीचा सुनीथ. सुनीथाचा सुकेतन. सुकेतनाचा धर्मकेतू आणि धर्मकेतूचा सत्यकेतू.
सत्यकेतूपासून धृष्टकेतू, धृष्टकेतूपासून राजा सुकुमार, सुकुमारापासून वीतिहोत्र, वीतिहोत्रापासून भर्ग आणि भर्गापासून राजा भार्गभूमीचा जन्म झाला.

हे सर्व क्षेत्रवृद्धाच्या वंशात काशीपासून उत्पन्न झालेले राजे होते. रंभाच्या पुत्राचे नाव होते रंभस, त्याच्यापासून गंभीर आणि गंभीरापासून प्रक्रिया चा जन्म झाला अक्रियाचा जन्म झाला. अक्रियाच्या पत्नीपासून ब्राह्मणवंश चालू झाला. आता अनेना याचा वंश ऐक. अनेनाचा पुत्र होता शुद्ध, शुद्धाचा शुची, शुचीचा त्रिककुद आणि त्रिककुदाचा धर्मसारथी. धर्मसारथीचा पुत्र होता शांतरय. शांतरय आत्मज्ञानी असल्याकारणाने कृतकृत्य झाला होता. रजीचे अत्यंत तेजस्वी असे पाचशे पुत्र होते.

देवतांनी प्रार्थना केल्यावरून रजीने दैत्यांचा वध करून इंद्राला स्वर्गाचे राज्य दिले. परंतु आपल्या प्रल्हाद इत्यादी शत्रूंपासून भीत असल्यामुळे त्याने ते स्वर्गाचे राज्य पुन्हा रजीला परत दिले आणि त्याचे पाय धरून आपल्या रक्षणाचा भार त्याच्यावरच सोपविला. जेव्ह रजीचा मृत्यू झाला, तेव्हा इंद्राने मागणी करूनसुद्धा रजीच्या पुत्रांनी स्वर्गाचे राज्य त्याला परत दिले नाही. ते स्वतःच यज्ञातील भागसुद्धा ग्रहण करू लागले. तेव्हा इंद्राच्या प्रार्थनेवरून गुरु बृहस्पतींनी अभिचार-विधीने हवन केले. यामुळे ते धर्ममार्गापासून भ्रष्ट झाले. तेव्हा इंद्राने सहजपणे त्या रजीच्या सर्व पुत्रांना मारून टाकले. त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिला नाही. क्षत्रवृद्धाचा नातू कुश याच्यापासून प्रति, प्रतिपासून संजय आणि संजयापासून जयाचा जन्म झाला. जयापासून कृत, कृतापासून राजा हर्यवन, हर्यवनापासून सहदेव, सहदेवापासून हीन आणि हिनापासून जयसेन नावाचा पुत्र झाला. जयसेनाचा संस्कृती, संस्कृतीचा पुत्र झाला महारथी जय. क्षत्रवृद्धाच्या वंशपरंपरेमध्ये एवढेच राजे झाले. आता नहुषवंशाचे वर्णन ऐक.

।। श्रीकृष्णार्पणामस्तु।।
।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीमद्भागवत महापुराण - स्कन्ध दहावा - अध्याय सहावा

श्री गणेशाय नमः श्रीशुकाचार्य म्हणतात - नंद मथुरेहून निघाले, तेव्हा वाटेत विचार करू लागले की, वसुदेवांचे म्हणणे खोटे असणार नाही; म्हणून संक...